Wednesday, 13 March 2019

बॉक्स क्रिकेट नियम व अटी :-

क्रिकेट हा सध्या च्या सर्वात लोकप्रिय खेळांमधील एक खेळ आहे.विशेषतः भारतात तर क्रिकेटचे वेड प्रत्येकाला आहे. सर्वप्रथम इंग्लंड मध्ये उगम पावलेला हा खेळ आता जगभर खेळला जातो.तसेच या खेळाचे प्रकारही पडले आहेत.वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे हा खेळ आता खेळला जातो. सोपेपणासाठी किंवा मजेसाठी बॉक्स क्रिकेटचे छोटे फॉरमॅट तयार करण्यात आले आहेत व त्याचे नियमही बदलले आहेत.
       याच प्रकारांममधील एक महत्वाचा प्रकार म्हणजे बॉक्स क्रिकेट! हा मूळ क्रिकेट खेळाचा छोटा फॉरमॅट आहे. सध्या बॉक्स क्रिकेटचे टोर्नामेंट्स वेगवेगळ्या स्तरावर मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात.
       मूळच्या क्रिकेट तुलनेत बॉक्स क्रिकेट बऱ्याच प्रमाणात वेगळा आहे.तो म्हणजे मैदानाच्या रचनेत आणि धावा जमवण्याचा पद्धतीत.
     
सर्वसाधारण नियम:-
१.प्रत्येक टीममध्ये कमीत कमी सहा किंवा जास्तीत जास्त आठ खेळाडू असतात. खेळाडूंची संख्या टोर्न्मेंटत भरावणारी कमिटी ठरवते. नेहमीच्या क्रिकेयप्रमाणे यात अकरा खेळाडू नसतात.बऱ्याच वेळा आठ खेळाडू समाविष्ट केले जातात.
२.सामना ३ते ८ षटकां चा असतो. सोपं पडावं म्हणून बऱ्याचदा ४ षटकांचा सामना ठेवण्यात येतो.
३.प्रत्येक गोलंदाज एकूण षटकाच्या १/४ षटकं टाकू शकतो.

फलंदाजीचे नियम :-
१.फलंदाजांच्या धावा तेव्हाच ग्राह्य धरल्या जातील जेव्हा त्याचा किमान एक पाय बॅटीग क्रिजच्या आत असावा लागतो.गोलंदाज चेंडू फेकण्याचा आधी!
२.आठ धाव फलकावर चेंडू मारल्यावर फलंदाजी संघाला ८ धावा मिळतात.
३.जर चेंडू छताला लागला तर तो छेडूं डेड मानला जातो. त्याच्यावर कोणतीही धाव अथवा विकेट मिळत नाही.
४.काही वेळा छत बाजुच्य भिंतींचे काम करते.या वेळी १ धाव दिली जाते.पण तो छेडूं झेल करून क्षेत्ररक्षक फलंदाजाला बाद करू शकतो.

गोलंदाजीचे नियम:-
१.अंडरआर्म गोलंदाजी अनिवार्य आहे.
२.छेन्दुचा टप्पा नो बॉल लाईनच्या पुढे पाडला पाहिजे, नाही तर तो नो बॉल धरला जातो.
३.गोलंदाजाला बॉलिंग क्रिज मधूनच गोलंदाजी करावी लागते.
४.नो बॉल , वाईड बॉल ,बाईज आणि ओव्हर थ्रो असे बाकीचे नियम मूळ क्रिकेतपासून असतात.
५.साईड आर्म बॉलिंग ची परवानगी नसते.

फलंदाज बाद करण्याचे मार्ग:-
१.फलंदाजाने मारलेला छेडूं चा पाहिला टप्पा जर बॉक्सच्या बाहेर पडला तर फलंदाज बाद होतो.
२.त्रिफळाचीत 
३.झेलबाद
४.धावचित
५.जर विकेट किपरने चेंडू स्टंप च्या आधीचं पकडला तर स्टूम्पिंग ग्राह्य धरली जात नाही.
६.जर सामना टाय झाला तर विजेता टॉस वर किंवा सुपर ओव्हर ने घोषित केला जातो.
७.दोन क्षेत्ररक्षक बॉलिंग क्रिज च्या मागे तर दोन क्षेत्ररक्षक व बॉलिंग क्रीजच्या पूढे असावे लागतात.
८.पंचांचा निर्णय अंतिम असतो.

    वरील नियमांवरून असे दिसते की,सामन्याचे नियम दोन्ही टीमच्या मध्यस्थीने बदलता येतात. हा खेळ प्रत्येक वयाच्या लोकांनी खेळला जातो. यामुळे व्यायामही होतो व आरोग्यही सुधारते!!!

8 comments: